७ जुलै २०१३ ची दुपार. थांबत-थांबत पडत असलेल्या रिमझिम पावसात
आम्ही शाळेचे ‘माजी’ विद्यार्थी संमेलनासाठी जमलेलो. ज्याला ज
विसावा मिळत होता तिथे घोळक्यात उभे होतो. तीनशे हून जास्त
माजी विद्यार्थी जमले होते. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनिअर, को
तर कोणी वकील. सगळेच आपल्या क्षेत्रात पुढारलेले.
अचानक शिटीचा आवाज आला आणि सगळे भारावून गेले. लेंभे
सरांनी दिलेली ती शिटीरुपी साद अजूनही ताजी होती.
शिटीच्या आवाजाने सगळे पुन्हा रांगेत उभे राहत होते. तितक्यात सर् म्हणाले
“बाळांनो आज मी तुमची पी.टी. नाही घेणार आहे.”
सगळ्यांनी टाळ्या वाजवून सरांच्या आवाजाला एकत्र दाद दिली.
माझ्या वेळचे सगळ्यात तरुण आणि कडक शिक्षक आज थोडेशे जाडे आण
दिसले. आम्ही कुजबुजलो “सरांचे थोडे केस पांढरे झालेत नं!” अर्थात अनेक माजी
विद्यार्थी सुद्धा पांढऱ्या केसांवर आणि मिशांवर आज काळी मेहंदी लावून
आले होतेच. अजूनही तोच आवाज त्याच ताकतीने आम्हाला साद घालत
आणि इतक्या वर्षांनी भेटल्याचा आनंद व्यक्त करतोय, हे पाहून मन भरून
शाळेची अवस्था आता पूर्वी सारखी राहिलेली नाही.
तिच्या भिंती म्हाताऱ्या झाल्यात. थोडीशी दुर्लक्षित झालीय. इ
लेंभे सर् पुन्हा म्हणाले – “बाळांनो, आई
किती ही म्हातारी झाली आणि कितीही गरीब
असली तरी तिला कोणी टाकत नाही.” काळीज धस्स झालं.
आम्ही सरस्वती वंदना केली, अगदी शाळेच्या सुरुवातीला करायचो तसे.
मूर्तीला वंदन करून आम्ही आमच्या वर्गात जाऊन बसलो.
शाळेच्या स्थापने पासून ते अगदी २०१३ मध्ये दहावी पास होऊन गेलेले
विद्यार्थी सोबत होते. माझ्या सोबतचे आम्ही १५ जण होतो. कदाच
सगळ्यात जास्त संख्येने आमचाच ग्रुप होता. फेसबुकला किती ही लोकांनी नावे
ठेवली तरी आम्ही ३० जण आज त्याच फेसबुकमुळे एकत्र आलो आहोत. गेल्या
वर्षी पासून आम्ही सगळे पुन्हा संपर्कात आलो होतो. त्याची झलक
आजच्या ह्या संमेलनात उठून दिसली. हे सांगताना अभिमानाने छात
आली कि अजूनही आम्ही सगळे संपर्कात आहोत.
श्री घुगे सरांनी स्वागत केले आणि माजी विद्यार्थ्यांच्या चर्चेला सुरु
झाली. हल्लीच्या वर्षात पास होऊन
गेलेल्या विद्यार्थ्यांनी ही सगळी धावपळ केली होती.
त्यांच्यातल्या अनेकांनी सर्वाना एकत्र येऊन शाळेसाठी ‘काहीतरी करण्याचे
आवाहन केले. त्यांच्या आवाहनामुळे जागृत होऊन सर्व संम्मतीने
माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचे ठरले आणि शाळेपासून दूर
गेलेल्या माझ्या सारख्यांना पुन्हा एकदा शाळेसाठी ‘काहीतरी’
करण्याची संधी उपलब्ध झाली. इथून पुढे शाळेसाठी ह्या संघठनेच्या माध्यमातून
खूप चांगली कार्य करण्याची योजना आखली जाणार आहे.
मला मात्र पुन्हा एकदा शाळेत माझ्या बाकावर माझ्या वर्गमित्र-
मैत्रिणीसोबत
बसायला मिळाल्याचा आणि माझ्या आवडत्या शिक्षकांना पुन्हा
भेटण्याचा प्रचंड आनंद होतोय. हरवलेली पाखरे पुन्हा शाळेकडे आली असेच
काही वाटत आहे.
तब्बल सोळा वर्षांनी मी पुन्हा माझ्या शाळेच्या बाकावर बसलो.
ह्यातला आनंद काय असू शकतो, हा त्या प्रत्येकाला समजेल जो १० वर्ष
शिकून आता मोठा झालाय आणि चक्क
सोळा वर्षांनी ज्याला पुन्हा आपल्या बाकावर थोडा वेळ
बसायला मिळालय.
मालाड पूर्व मधील मंगेश विद्या मंदीर ह्या शाळेतून दहावी पास होऊन
आता चक्क सोळा वर्षे उलटली. आयुष्यात खूप काही मिळाले. शाळेने
संस्कार, शिक्षकांनी दिलेले उपदेश आणि शिक्षण
आजही मला उपयोगी पडतात. त्या सगळ्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील.
(साभार – मंगेश विद्या मंदीर – माझी शाळा , सम्मेलनाचे आयोजक,लेंभे
सर् आणि श्री. घुगे सर्, माझे वर्ग मित्र आणि मैत्रिणी, इतर माजी विद्यार्थी
लेखन – श्री स्मितीन ब्रीद (८ जुलै २०१३)
आम्ही शाळेचे ‘माजी’ विद्यार्थी संमेलनासाठी जमलेलो. ज्याला ज
विसावा मिळत होता तिथे घोळक्यात उभे होतो. तीनशे हून जास्त
माजी विद्यार्थी जमले होते. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनिअर, को
तर कोणी वकील. सगळेच आपल्या क्षेत्रात पुढारलेले.
अचानक शिटीचा आवाज आला आणि सगळे भारावून गेले. लेंभे
सरांनी दिलेली ती शिटीरुपी साद अजूनही ताजी होती.
शिटीच्या आवाजाने सगळे पुन्हा रांगेत उभे राहत होते. तितक्यात सर् म्हणाले
“बाळांनो आज मी तुमची पी.टी. नाही घेणार आहे.”
सगळ्यांनी टाळ्या वाजवून सरांच्या आवाजाला एकत्र दाद दिली.
माझ्या वेळचे सगळ्यात तरुण आणि कडक शिक्षक आज थोडेशे जाडे आण
दिसले. आम्ही कुजबुजलो “सरांचे थोडे केस पांढरे झालेत नं!” अर्थात अनेक माजी
विद्यार्थी सुद्धा पांढऱ्या केसांवर आणि मिशांवर आज काळी मेहंदी लावून
आले होतेच. अजूनही तोच आवाज त्याच ताकतीने आम्हाला साद घालत
आणि इतक्या वर्षांनी भेटल्याचा आनंद व्यक्त करतोय, हे पाहून मन भरून
शाळेची अवस्था आता पूर्वी सारखी राहिलेली नाही.
तिच्या भिंती म्हाताऱ्या झाल्यात. थोडीशी दुर्लक्षित झालीय. इ
लेंभे सर् पुन्हा म्हणाले – “बाळांनो, आई
किती ही म्हातारी झाली आणि कितीही गरीब
असली तरी तिला कोणी टाकत नाही.” काळीज धस्स झालं.
आम्ही सरस्वती वंदना केली, अगदी शाळेच्या सुरुवातीला करायचो तसे.
मूर्तीला वंदन करून आम्ही आमच्या वर्गात जाऊन बसलो.
शाळेच्या स्थापने पासून ते अगदी २०१३ मध्ये दहावी पास होऊन गेलेले
विद्यार्थी सोबत होते. माझ्या सोबतचे आम्ही १५ जण होतो. कदाच
सगळ्यात जास्त संख्येने आमचाच ग्रुप होता. फेसबुकला किती ही लोकांनी नावे
ठेवली तरी आम्ही ३० जण आज त्याच फेसबुकमुळे एकत्र आलो आहोत. गेल्या
वर्षी पासून आम्ही सगळे पुन्हा संपर्कात आलो होतो. त्याची झलक
आजच्या ह्या संमेलनात उठून दिसली. हे सांगताना अभिमानाने छात
आली कि अजूनही आम्ही सगळे संपर्कात आहोत.
श्री घुगे सरांनी स्वागत केले आणि माजी विद्यार्थ्यांच्या चर्चेला सुरु
झाली. हल्लीच्या वर्षात पास होऊन
गेलेल्या विद्यार्थ्यांनी ही सगळी धावपळ केली होती.
त्यांच्यातल्या अनेकांनी सर्वाना एकत्र येऊन शाळेसाठी ‘काहीतरी करण्याचे
आवाहन केले. त्यांच्या आवाहनामुळे जागृत होऊन सर्व संम्मतीने
माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचे ठरले आणि शाळेपासून दूर
गेलेल्या माझ्या सारख्यांना पुन्हा एकदा शाळेसाठी ‘काहीतरी’
करण्याची संधी उपलब्ध झाली. इथून पुढे शाळेसाठी ह्या संघठनेच्या माध्यमातून
खूप चांगली कार्य करण्याची योजना आखली जाणार आहे.
मला मात्र पुन्हा एकदा शाळेत माझ्या बाकावर माझ्या वर्गमित्र-
मैत्रिणीसोबत
बसायला मिळाल्याचा आणि माझ्या आवडत्या शिक्षकांना पुन्हा
भेटण्याचा प्रचंड आनंद होतोय. हरवलेली पाखरे पुन्हा शाळेकडे आली असेच
काही वाटत आहे.
तब्बल सोळा वर्षांनी मी पुन्हा माझ्या शाळेच्या बाकावर बसलो.
ह्यातला आनंद काय असू शकतो, हा त्या प्रत्येकाला समजेल जो १० वर्ष
शिकून आता मोठा झालाय आणि चक्क
सोळा वर्षांनी ज्याला पुन्हा आपल्या बाकावर थोडा वेळ
बसायला मिळालय.
मालाड पूर्व मधील मंगेश विद्या मंदीर ह्या शाळेतून दहावी पास होऊन
आता चक्क सोळा वर्षे उलटली. आयुष्यात खूप काही मिळाले. शाळेने
संस्कार, शिक्षकांनी दिलेले उपदेश आणि शिक्षण
आजही मला उपयोगी पडतात. त्या सगळ्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील.
(साभार – मंगेश विद्या मंदीर – माझी शाळा , सम्मेलनाचे आयोजक,लेंभे
सर् आणि श्री. घुगे सर्, माझे वर्ग मित्र आणि मैत्रिणी, इतर माजी विद्यार्थी
लेखन – श्री स्मितीन ब्रीद (८ जुलै २०१३)